Thursday, August 24, 2023

भारतीय राज्य घटना

 आजच्या अंकात श्री पद्माकर कांबळे यांचा माहितीपूर्ण लेख आहे. कालचा आणि आजचा लेख मिळून हा विषय पूर्ण झाला. आजच्या पुरता!! भारतीय राज्यघटनेसंबंधी काही निरीक्षणे खालीलप्रमाणे नोंदवता येतील.

(लेख २३/८/२३ आणि २४/८/२३ रोजी प्रसिध्द झाले. )

१. आजतागायत १०५ वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली. म्हणजेच मूळ संहितेच्या स्वरूपात राज्यघटना अस्तित्वातच नाही.
२. राज्यघटना खूप जास्त सद् भावनेने बनविण्यात आली. पण ती सद्भावना पुढे राहिली नाही. कारण त्याप्रमाणे राज्यघटना राबवण्यात आली नाही. त्यामुळे असंख्य कज्जेदलालीचा जन्म झाला.
३. धर्मावर आधारित फळणी झाल्यानंतर हा माझा देश धर्मनिरपेक्ष बनला. त्याचा अर्थ असा लावला पाहिजे की या माझ्या देशात फक्त स्वतः बनवून स्वतःला अर्पण केलेल्या राज्यघटनेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनीच राहिले पाहिजे. ज्यांचा विश्वास नाही ते अल्पसंख्य. त्यांनी इथे राहू नये किंवा कसलेही अधिकार मागू नयेत.
४. आता धर्माच्या किंवा संप्रदायाच्या आधारावर काहीना अल्पसंख्य समजले जाते. पण ही राज्यघटना बनविताना असलेल्या सद्भावनेची पायमल्ली आहे.
५. काँग्रेस पक्षाचे सदस्य आणि भारत सरकारचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी, पंतप्रधान पंडित नेहरूंच्या पाठिंब्याने, पोलीस कृतीने हैदराबाद संस्थान ताब्यात घेतले, तसेच सैन्यदलाची कृती करून गोवा मुक्त केले व ताब्यात घेतले. त्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधींनी सिक्कीम ताब्यात घेतले. मग हाच प्रबळ विचार पुढे नेऊन कश्मीरचे सामीलीकरण का केले नाही? कलम ३७० चा घोळ ही त्या सदभावनेची पायमल्ली आहे. "इनर लाईन" नावाचा एक घोळ उत्तरपूर्व राज्यात अस्तित्वात आहे, जो राजस्थान पंजाब सारख्या सीमावर्ती भागात नाही.
६. विश्वनाथ प्रताप सिंग सारख्या सामान्य कुवतीच्या पंतप्रधानांचे एक पाप "राखीव जागा" आता भूते बनून भारतवासीयांचा आत्मा शोषत आहे. अत्यंत निर्बुद्ध आणि जाचक बंधनात अर्थकारणाला अडकवून ठेवून नुसत्या राखीव जागांनी देशाची प्रगती होईल असे समजणे हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. आज याच राखीव जागांच्या भूताने मणिपूर जाळायला सुरुवात केली आहे. यानंतर कोणत्या राज्याचा "आकडा" लागणार हे हतबल होऊन पहात बसायचे.
७. ज्या अर्थतज्ञाने नवीन राज्यघटनेची मागणी केली आहे तो हे लक्षात घेत नाही की नवी येणारी राज्यघटना जुन्या राज्यघटनेच्या आधारावरच असेल. तसेच त्याने जर नव्या राज्यघटनेत काय हवे हे सांगितले, तर त्याचे सध्याचे सल्लागारपद नक्कीच जाईल आणि कोणत्यातरी परदेशी विद्यापीठात नोकरी करावी लागेल.

0 Comments:

Post a Comment

<< Home